समाजाचे आपण देणे लागतो" या उदात्त भावनेतून प्रेरित होऊन कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात कोरोनाग्रस्तांचे अंतिम संस्कार, शाळा- कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी "आपली सुरक्षा, आपली जबाबदारी" यासारखे जनजागृती उपक्रम, लैंगिक शिक्षण, सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन, आदिवासी व अनिवासी (विटभट्टीतील कामगारांच्या मुलांसाठी ) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आले.